मी गावी ‘लाडली’ला असताना आम्ही लहान मोठी मुलं गावातल्या पानामाय जवळ जमत असायचो.
न्यूज चॅनेल्सवर चर्चांचे फड रंगतात तसेच आमचेही फड रंगायचे. कुणाच्या घरात टीव्ही नव्हते म्हणुन मनोरंजनासाठी असंही नाही, पण एकटं दूरदर्शन काय काय दाखवणार ना! आज कोणता विषय निघेल याला काही नेम नसायचा. विषयाला कुणीही हात घालावा, त्याला लगेच समर्थनार्थ आणि विरोधासाठी दोन गट तयारच. गट तयार होत असताना प्रत्येकाला विषय कळणं कम्पल्सरी वगैरे नाही बरं का! उगाच आपला ‘क्ष’ म्हणतोय ना मग मी विरोध करणार किंवा समर्थन करणार. काहींना त्या विषयाचा म्हणजे अगदी गाढा वगैरे अभ्यास, तसा त्यांचा अविर्भाव तरी. म्हणजे ‘पवारसाहेब, बाळासाहेब’ असोत, नाही तर ‘क्रिकेटची संघ निवड’ जशी रात्री एकाच बाटलीत पेले रिते करताना सर्व यांच्याच सल्ला मसलतीनेच. हिटलर, मुसोलिनी, अगदी लादेन सुध्दा यांच्याच सल्ल्याने हल्ले वगैरे करायची. ते स्वतः पाकीस्तानात जाऊन एकेका अतिरेक्याला ठेचून ठार वगैरे मारणार असतात, पण शेतात रात्री धुडगूस घालणाऱ्या डुकरांना घाबरवण्यासाठी सुतळी बॉम्ब लावायला जायचं असतं. टपरीवरची उधारी वर्षानुवर्षे थकवणारा त्या पंचावन्न कोटींचं रडगाणं रडायचा. उगाच प्रवक्ता वगैरेचे चोचले नाही त्यामुळे ‘पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील’ सारखे कातळी बचाव उत्तर नाहीत. चर्चेत सहभागी होण्याची तुझी लायकी नाही म्हणुन ‘तू चालता हो’ पासून ते एखाद्यावर हात उगारेपर्यंत. विद्यापीठात प्राध्यापक झालो, गाव सुटलं आणि हे असे चर्चांचे फड आता रंगणार नाहीत असं वाटायला लागलं. पण आता आम्ही प्राध्यापक मित्र जेवताना जमतो आणि... वांझोट्या गप्पा.
न्यूज चॅनेल्सवर चर्चांचे फड रंगतात तसेच आमचेही फड रंगायचे. कुणाच्या घरात टीव्ही नव्हते म्हणुन मनोरंजनासाठी असंही नाही, पण एकटं दूरदर्शन काय काय दाखवणार ना! आज कोणता विषय निघेल याला काही नेम नसायचा. विषयाला कुणीही हात घालावा, त्याला लगेच समर्थनार्थ आणि विरोधासाठी दोन गट तयारच. गट तयार होत असताना प्रत्येकाला विषय कळणं कम्पल्सरी वगैरे नाही बरं का! उगाच आपला ‘क्ष’ म्हणतोय ना मग मी विरोध करणार किंवा समर्थन करणार. काहींना त्या विषयाचा म्हणजे अगदी गाढा वगैरे अभ्यास, तसा त्यांचा अविर्भाव तरी. म्हणजे ‘पवारसाहेब, बाळासाहेब’ असोत, नाही तर ‘क्रिकेटची संघ निवड’ जशी रात्री एकाच बाटलीत पेले रिते करताना सर्व यांच्याच सल्ला मसलतीनेच. हिटलर, मुसोलिनी, अगदी लादेन सुध्दा यांच्याच सल्ल्याने हल्ले वगैरे करायची. ते स्वतः पाकीस्तानात जाऊन एकेका अतिरेक्याला ठेचून ठार वगैरे मारणार असतात, पण शेतात रात्री धुडगूस घालणाऱ्या डुकरांना घाबरवण्यासाठी सुतळी बॉम्ब लावायला जायचं असतं. टपरीवरची उधारी वर्षानुवर्षे थकवणारा त्या पंचावन्न कोटींचं रडगाणं रडायचा. उगाच प्रवक्ता वगैरेचे चोचले नाही त्यामुळे ‘पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील’ सारखे कातळी बचाव उत्तर नाहीत. चर्चेत सहभागी होण्याची तुझी लायकी नाही म्हणुन ‘तू चालता हो’ पासून ते एखाद्यावर हात उगारेपर्यंत. विद्यापीठात प्राध्यापक झालो, गाव सुटलं आणि हे असे चर्चांचे फड आता रंगणार नाहीत असं वाटायला लागलं. पण आता आम्ही प्राध्यापक मित्र जेवताना जमतो आणि... वांझोट्या गप्पा.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करतो. ‘भारत हा एक खूपसाऱ्या मूर्खांचा पण काही हुशार-सद्गृहस्थांच्या कृपेमुळे लोकशाही असलेला देश आहे’ असं माझं वैयक्तिक वगैरे मत. मी सुध्दा एक पक्की भारतीय कळपातील मेंढी (पुल्लिंगी!). माज-गर्व अजिबात नाही, पुल्लिंगी/भारतीय/मेंढी कसलाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा