सहनशक्ती


हा देवपण ना.
मारकं बैल, भुंकणारं कुत्रं, विष्टेत तोंड घालणारं डुक्कर आदी बनवायची सामग्री घेऊन छानसं श्वापद बनवायला बसतो. छान माती घेतो, त्यात गरजे इतकं पाणी मिसळतो. थोडी अक्कल (गरज असल्यास, शक्यतो नाहीच), स्वभाव (भुंकणं, नको तिथे शिंग किंवा तोंड घालणं आदी) बाकी इतर तत्सम सवयी, रंग मातीत मिसळतो. मिश्रण चांगलं एकजिनसी होऊ देतो. छापे काढायचा विचारच करतो, अचानक काहीतरी होतं आणि तो उठुन निघून जातो (बायकोच्या फोनमुळे असेल कदाचित) परततो तो संतापातच. स्वतःच्या नशिबाला शिव्या देत विचाराच्या चक्रात काहीतरी बनवुन मोकळा होतो आणि देतो आमच्या सारख्याकडे पाठवुन. 
मग आमच्या भाळी लिहीली जातात, ही फक्त दोन पायाची पिसाळलेली श्वापदं. भोग नाही तर काय? बरं, आमच्या मिश्रणात सहनशक्ती तरी वाढवुन द्यावी ना, तर नाही. असो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा